“गावाचा इतिहास — काळाच्या प्रवाहातील अमूल्य ठेवा”

शिक्षक ते गावचा मुखिया सुवर्णसिंग गिरासे ग्रामपंचायत स्थापना 1964 साली झाली. पूर्वीचे वाडी गाव हे वाडी- शेवाडी मध्यम प्रकल्पांतर्गत पुनर्वसन झालेलं आहे. आज गावाची लोकसंख्या 1500 ते 1600 च्या दरम्यान आहे. आतापर्यंत बारा सरपंच होऊन गेले आहेत. तेरावा सरपंच म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांना राजकीय वारसा असल्याने समाजसेवेची आवड होती त्यामुळे त्यांनी सरपंच व्हावे यासाठी […]
वाडी गावचा प्रवास: संघर्षातून समृद्धीकडे

“सरपंच आपल्या दारी ,योजना कल्याणकारी” या उपक्रमांतर्गत गावातील नागरिकांना विविध योजनांची माहिती, कागदपत्रे यांचे वाटप करण्यात. नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या जातात.
ग्रामीण विकासात ग्रामपंचायतीची भूमिका

ग्रामीण विकासात ग्रामपंचायतीची भूमिकावाडी ग्रामपंचायत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. विषमुक्त शेती करण्यासाठी सप्त संपादनावर काम सुरू झाले आहे. जल ,जमीन, जंगल, जनावर, जन ( मनुष्य) शिक्षण,स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सातत्याने प्रगती साधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. लोकसहभाग आणि पारदर्शक प्रशासन हीच आमची ताकद आहे.
स्वच्छ गाव, सुंदर गाव – स्वच्छता अभियान

स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न ग्रामपंचायतीतर्फे गावात दर आठवड्याला स्वच्छता मोहिम राबवली जाते. ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत, प्रत्येक घरातून कचरा वेगळा गोळा करण्याची योजना यशस्वीपणे राबवली जात आहे.
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

वाडी गावातील शेतकरी आता ड्रिप सिंचन, सेंद्रिय खत आणि आधुनिक उपकरणांचा वापर करून शेतीत चांगले उत्पन्न मिळवत आहेत. ग्रामपंचायत आणि कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकऱ्यांना नवनवीन प्रशिक्षण दिले जात आहे. एकेकाळी पूर्णतः कोरडवाहू शेती असलेला आमचं वाडी गाव आज वाडीशेवाडी प्रकल्पामुळे गावातील 70 ते 80 टक्के शेतकरी फळबाग ची शेती करतात.
शिक्षणाचा विकास आणि बालकांचे भविष्य
ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने शाळांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, डिजिटल शिक्षण साधने आणि मुलींसाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत. शिक्षणाद्वारेच गावाचा खरा विकास साधता येतो, असा आमचा विश्वास आहे.
जलसंवर्धन – पाण्यासाठी आज आणि उद्या

जल व्यवस्थापन:- गावकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून जिल्हा परिषद च्या माध्यमातून एक जल कुंभाला पाण्याचं फिल्टर बसवण्यात आलेला आहे, त्या फिल्टरचं नियमित व्यवस्थापन केलं जातं . तसेच आता 15व्या वित्त आयोग पंचायत समिती स्तर या निधी मधून 7.50 लाखाचं RO वॉटरचा प्लांट मंजूर करण्यात आलेला आहे. व हे शुद्ध पाणी QR कोडने स्कॅन करून […]